मुंबई : शाळेत असताना भल्याभल्या हुशार विद्यार्थ्यांची गणित, विज्ञानामध्ये दांडी गुल होते. त्यामुळे गणित, विज्ञान विषयाला घाबरणारे खूप जण असतात. अनेक विद्यार्थी तर बाकीच्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवतात पण त्यांना गणित आणि विज्ञान विषयात ३५ गुणही मिळवता येत नाहीत. आता या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रातील अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक नियम काढला आहे.
दरम्यान, गणित आणि विज्ञान विषयात दांडी गुल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आली असून, महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे. १०० गुणांच्या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला ३५ गुणांची गरज असते. मात्र आता तुम्हाला ३५ ऐवजी केवळ २० गुणांची गरज लागणार आहे.
हा बदल राज्यात कधीपासून?
सरकारने एसएससीमधील (SSC) या दोन्ही विषयांचे उत्तीर्ण गुण १०० पैकी ३५ वरून २० वर आणले आहेत. असे असले तरी यासोबत एक नियमही आहे. वास्तविक जे विद्यार्थी या पद्धतीने उत्तीर्ण होतील. त्यांच्या मार्कशीटमध्ये एक नोटदेखील असेल. ज्यामध्ये ते पुढे गणित किंवा विज्ञानाचा अभ्यास करू शकत नाहीत, असे त्यात लिहिलेले असेल. स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संचालक राहुल रेखावार यांनी या संदर्भात माहिती दिली. की, ‘हा बदल शालेय शिक्षण विभागाने आधीच मंजूर केलेल्या नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्याचा भाग आहे, असे ते म्हणाले. असे असले तरी हा बदल राज्यात नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यावर अंमलात येईल.
विद्यार्थ्यांना मिळणार दोन पर्याय!
माहितीनुसार, दहावीत गणित आणि विज्ञान परीक्षेत २० पेक्षा जास्त आणि ३५ पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय मिळणार आहेत. पहिल्या पर्यायानुसार नेहमीप्रमाणे पुन्हा परीक्षा देऊन या विषयांत उत्तीर्ण होता येईल. आणि दुसऱ्या पर्यायात विद्यार्थ्याला उत्तीर्ण म्हणून अकरावीला प्रवेश घेता येईल, मात्र पुढील शिक्षणात गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारित अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नाही. त्याबाबत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरच प्रवेश देण्यात येणार आहे.
शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर जाऊ नये म्हणून…
या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांना ह्युमॅनीटीज किंवा कला शाखेची आवड आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणित किंवा विज्ञानात नापास होऊन विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाते. यानंतर विद्यार्थ्यांकडे क्षमता असली तरी पुढील अभ्यासासाठी कोणताही पर्याय उरत नाही. तसेच दहावीला अनुत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षण अर्धवट सोडणारे किंवा सोडायला भाग पाडणाऱ्या घटनाही गाव खेड्यात जास्त प्रमाणात घडतात. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर फेकले जाणार नाहीत, यासाठी बदल करण्यात आले आहेत. जेणेकरुन विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहून आपल्या करिअरच्या आकांक्षा पूर्ण करू शकणार आहेत.
मिळेल नवीन गुणपत्रिका!
२० गुण मिळवून विद्यार्थी गणित, विज्ञान विषयात उत्तीर्ण होऊ शकतील. असे असले तरी संबंधित विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर ते पुढील वर्षी पूरक परीक्षा किंवा नियमित परीक्षा देऊ शकणार आहेत. या विषयात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना नवीन गुणपत्रिका मिळू शकते, अशी माहितीदेखील शिक्षण मंडळाने दिली आहे.